'लाडक्या बहिणींना' भाजपा चा झटका ?

 

               
       
          'लाडक्या बहिणींना' भाजपा चा झटका ?

           
            
सातारा, दि.१० :- रविंद्र वाकडे.
मा.मुख्यमंत्री यांनी लाडक्या  बहिणीना केवळ 1500 रुपये आमिष दाखवले होते.
मा. मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तो पर्यंत ही योजना सुरळीत सुरू होती. मात्र मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले पासून सतत काही न काही प्रॉब्लेम आणि वेगवेगळ्या नियमानुसार ही योजना बारगळत चालली आहे. दर महिन्याला एक नवा नियम सुरू आहे. गरजू महिलांना पैसे येणे बंद झाले आहे .दर महिन्याला फक्त पोकळ आश्वासन मिळत आले आहे, आणि पैसे मात्र गायब झाले आहेत. 2 ते 3 महिने झाले शेकडो भगिनींना पैसे आले नाहीत.या भगिनी बँकेत हेलपाटे मारून दमल्या.केवायसी कागदपत्रे पूर्तता पूर्ण केली. तरीही पैसे जमा झाले नाहीत.तसेच त्या बाबत कोणीही माहिती देत नाही.'लाडकी बहिण ' योजनेच्या मदतीसाठी अनेक पदाधिकारी नियुक्त केले होते.पण आता मात्र ते सर्व गायब झाले आहेत,आणि जे काम करत आहेत,
**************************
ही योजना सुरळीत चालू करणे किव्हा गरजू बहिणींना या योजनेत पैसे मिळत नाही त्या मध्ये तांत्रिक अडचणी आहेत या येत असणाऱ्या अडीचणी  बाबत भाजपा चे आमदार आणि पदाधिकारी लक्ष देणार काय ??????
----/////---------------------
ते पैसे घेत आहेत.निवडणूक आली की,योजनांचा पाऊस पाडला जातो आणि निवडणूक झाली की,या सर्व योजना गुंडाळून ठेवल्या जातात.असा आरोप महिलांच्या कडून केला जात आहे.त्यामुळे येऊ घातलेल्या मिनी मंत्रालय जि. प. व पं. स.निवडणूक मध्ये याचा नकारात्मक परिणाम दिसून आला तर काही गैर नाही. साहजिकच मा.मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी सुरू केलेली' लाडकी बहिण' योजना सध्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस सुरळीतपणे चालू ठेवतील का ? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments